CoronaVirus : “मोदी सरकारनं टीका करण्यासाठी वेळ ठरवून द्यायला हवी”

देशात आणि राज्यात करोनामुळे पहिल्यादांच लॉकडाउन लागू झाला आहे. करोनानं शिरकाव करताच केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलणं आवश्यक होती, अशी टीका राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, ही वेळ टीका करण्याची नाही, असं सरकार आणि भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यावरून ब्रिजेश कलाप्पा यांची एक पोस्ट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे.