सध्याच्या स्थितीत हे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच : आदिनाथ कोठारे

देशात करोनाचा उद्रेक झालेला असताना आयोजित करण्यात आलेल्या तबलिकी मरकजवर देशभरातून टीका होऊ लागली आहे. २५ जणांना करोनाची लागण झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. त्यानंतर केंद्र आणि दिल्ली सरकारनं तातडीनं कारवाई करत ही जागा रिकामी केली होती. या घटनेवर अभिनेता आदिनाथ कोठारे यानेही नाराजी व्यक्त केली आहे. ‘सध्याच्या स्थितीत असं काही करणं म्हणजे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच आहे,’ अशा शब्दात त्याने नाराजी बोलून दाखवली आहे.